
Tuesday, September 17, 2013
Saturday, July 27, 2013
काळजात घर करून राहणारी दुष्यंत कुमार यांची गझल (kaaljaat ghar karun raahanaari Dushyant Kumar Yanchi Gazal)-by Adv.Amol Waghmare
kaaljaat ghar karun raahanaari Dushyant Kumar Yanchi Gazal-by Adv.Amol Waghmare
काळजात घर करून राहणारी दुष्यंत कुमार यांची गझल
-by Adv.Amol Waghmare
दुष्यंत कुमार हे नाव जगभरातील हिंदी,उर्दू आणि मराठीसह अनेक भाषांमधील
गझल रसिकांमध्ये सर्वपरिचित आहे. हिंदी गझलविश्वात वेगळे स्थान निर्माण करून वाचकांच्या काळजात घर करून राहणारी गझल, अशी दुष्यंत कुमार यांच्या गझलेची ओळख आहे. हिंदी गझलेला नवे आयाम देवून त्यांनी समृद्ध केले आहे. दुष्यंत कुमार यांच्या गझल साहित्याविषयी विपुल लेखन झाले आहे. बदलत्या कालाच्या परिप्रेक्ष्यामध्ये देखील या गझलांची समयोचित अर्थपूर्णता व श्रेष्ठत्व अबाधित आहे. समकालीन मुल्य असल्यामुळे आजही ही गझल तितकीच प्रभावी आहे. त्यामुळेच दुष्यंत कुमार यांची गझल आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
ये जुबाँ हमसे सी नहीं जाती
जिंदगी है कि जी नहीं जाती
इन सफ़िलोमे वो दरारे है
जिसमे बसकर नमी नहीं जाती
एक आदत सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती
मुझको ईसा बना दिया तुमने
अब शिकायत भी की नहीं जाती
('साये मी धूप', पृ. ४५)
अतिशय साध्या शब्दांत विविध विषयांवर नेमकेपणाने भाष्य करण्याची हातोटी
कवीला लाभली होती. हिंदीमध्ये प्रचलित गझल परंपरेपेक्षा वेगळी आणि
गझल आकृतीबंधाचे सर्व निकष सांभाळून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपणारी,
स्वतंत्र लेखनशैली असलेली ही गझल
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं
मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए
या दुष्यंत कुमार यांच्या उक्तीस लेखनाच्या बाबतीत सार्थ ठरवते. दुष्यंत यांची
गझल बहुचर्चित आणि लोकप्रिय आहे. अनेक समीक्षकांनी या गझलेचे विविध अंगांनी
विश्लेषण केले आहे. उच्च निर्मितीमूल्य असलेल्या या गझलेवर भाष्य करतानाच
समीक्षकांनी तिचे श्रेष्ठत्व वेळोवेळी प्रमाणित केले आहे.
कहाँ तो तय था चिरागाँ हरेक घर के लिए
कहाँ चिराग मयस्सर नहीं शहर के लिए
यहाँ दरख्तों के साए में धूप लगती है
चलो यहाँ से चले उम्रभर के लिए
न हो कमीज तो पाँवोसे पेट ढक लेंगे
ये लोग कितने मुनासिब है, इस सफ़र के लिए
वे मुतमइन है कि पत्थर पिघल नहीं सकता
मै बेकरार हूँ आवाज़ में असर के लिए
('साये मी धूप', पृ. १३ )
गझल लिहिताना गझलकाराला विचारांचा समुद्र कमंडलू मध्ये धारण करणारा अगस्ती
व्हावे लागते, तेव्हा कुठे गझल सशक्त बनते. म्हणजेच शेर लिहित असताना एखादा
विषय अथवा विचार त्याच्या संपूर्ण व्याप्तीसह मोजक्या शब्दात मांडावा लागतो
आणि हे करताना गझलेच्या तंत्राची चौकात सांभाळून अभिव्यक्तीतील प्रभावीपणा
कुठेही कमी होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागते. गझलेच्या पहिल्या
ओळीत एखाद्या विषयाची कौशल्यपूर्वक मांडणी केलेली असते आणि दुसऱ्या
ओळीत या विषयाचा कौशल्याने समारोप केलेला असतो. विषय वैविध्य ही सशक्त
गझल निर्मितीची अपरिहार्यता असते.
खँडहर बचे हुए है इमारत नहीं रही
अच्छा हुआ कि सर पर कोई छत नहीं रहीं
तमाम उम्र हमने अकेले सफ़र किया
हमपर किसी खुदा की इनायत नही रही
कुछ दोस्तोंसे वैसे मरासिम नहीं रहे
कुछ दुश्मनोंसे वैसी अदावत नहीं रही
साइन में जिंदगी के अलामत है अभी
गो जिंदगी की कोई जरुरत नहीं रही
('साये मी धूप', पृ. १८)
दुष्यंत कुमार यांची गझल वाचकांच्या मन:पटलांवर संवेदनांचे जे तरंग उमटवते,
ते वाचकांना विचार करायला भाग पाडतात. कवीच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या
संवेदना जेव्हा वाचकांच्या मनातील संवेदनांशी नाते सांगू लागतात आणि वाचकही
जेव्हा कवीच्या शब्दांमधील संवेदनांमध्ये स्वत:च्या संवेदना शोधू लागतात;
फक्त तेव्हाच कोणत्याही रचनेच्या निर्मितीस पूर्णत्व येते,असे म्हटले पाहिजे.
दुष्यंत कुमार यांची गझल बहुआयामी आहे. ती साचेबद्ध नाही. एक निरागसता
आणि प्रवाहीपणा या गझलेने जोपासला आहे.
इस रास्ते के नाम लिखो एक शाम और
या इसमे रोशनी का करो इंतजाम और
आँधी में सिर्फ हम ही उखड़कर नहीं गिरे
हमसे जुदा हुआ था कोई एक नाम और
मरघट पे भीड़ है या मजारों पे भीड़ है
अब गुल खिला रहा है तुम्हारा निजाम और
हैरां थे अपने अक्स पे घर के तमाम लोग
शीशा चटख गया तो हुआ एक काम और
सामाजिक विषयांवर देखील कवीने अनेक ठिकाणी मार्मिक भाष्य केले आहे. त्यामुळे सामाजिक वास्तवाबाबत अत्यंत जागरूक भान असलेली ही गझल असल्याचे वाचकाना
सहजपणे जाणवते. समाजातील विरोधाभासांवर कवीने काही अशआर ('शेर' चे अनेकवचन) मधून
प्रखरपणे प्रहार केल्याचे जाणवते. यासाठी उपरोधिक आणि उपहासगर्भ शैलीत भाष्य
करण्यात प्रभावी भाष्य करण्यात कवी यशस्वी ठरला आहे. दुष्यंत कुमार यांनी गैर-मुसलसील गझल जास्त प्रमाणात लिहिली आहे. गैर-मुसलसील गझले मध्ये वेगवेगळ्या विषयांवरील
शेर एकाच गझलेत समाविष्ट केलेले असतात. गैर-मुसलसीलीयत हे गझलेचे खास वैशिष्ट्य समजले जाते.
अब किसीको भी नजर नहीं आती कोई दरार
घर की हर दिवार पर चिपके है इतने इश्तेहार
हालते इन्सान पर बरहम न हो अहले वतन
वो कहींसे जिंदगी भी मांग लायेंगे उधार
रोज अखबारों में पढ़कर ये ख़याल आया हमें
इस तरफ आती तो हम भी देखते फ़स्ले बहार
जवळपास फक्त ५३ गझल रचना करूनही हिंदी गझलेचा शिखर्बिंदू असल्याची
सर्वमान्यता मिळाल्याने दुष्यंत कुमार यांच्या काव्यप्रतिभेचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.
-by Adv.Amol Waghmare
amolwaghmare001@gmail.com
mob-9404485850
8421561384
पुर्व प्रकाशन :"साक्षात" (एप्रिल-मे-जून ) - २०१२
काळजात घर करून राहणारी दुष्यंत कुमार यांची गझल
-by Adv.Amol Waghmare
दुष्यंत कुमार हे नाव जगभरातील हिंदी,उर्दू आणि मराठीसह अनेक भाषांमधील
गझल रसिकांमध्ये सर्वपरिचित आहे. हिंदी गझलविश्वात वेगळे स्थान निर्माण करून वाचकांच्या काळजात घर करून राहणारी गझल, अशी दुष्यंत कुमार यांच्या गझलेची ओळख आहे. हिंदी गझलेला नवे आयाम देवून त्यांनी समृद्ध केले आहे. दुष्यंत कुमार यांच्या गझल साहित्याविषयी विपुल लेखन झाले आहे. बदलत्या कालाच्या परिप्रेक्ष्यामध्ये देखील या गझलांची समयोचित अर्थपूर्णता व श्रेष्ठत्व अबाधित आहे. समकालीन मुल्य असल्यामुळे आजही ही गझल तितकीच प्रभावी आहे. त्यामुळेच दुष्यंत कुमार यांची गझल आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
ये जुबाँ हमसे सी नहीं जाती
जिंदगी है कि जी नहीं जाती
इन सफ़िलोमे वो दरारे है
जिसमे बसकर नमी नहीं जाती
एक आदत सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती
मुझको ईसा बना दिया तुमने
अब शिकायत भी की नहीं जाती
('साये मी धूप', पृ. ४५)
अतिशय साध्या शब्दांत विविध विषयांवर नेमकेपणाने भाष्य करण्याची हातोटी
कवीला लाभली होती. हिंदीमध्ये प्रचलित गझल परंपरेपेक्षा वेगळी आणि
गझल आकृतीबंधाचे सर्व निकष सांभाळून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपणारी,
स्वतंत्र लेखनशैली असलेली ही गझल
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं
मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए
या दुष्यंत कुमार यांच्या उक्तीस लेखनाच्या बाबतीत सार्थ ठरवते. दुष्यंत यांची
गझल बहुचर्चित आणि लोकप्रिय आहे. अनेक समीक्षकांनी या गझलेचे विविध अंगांनी
विश्लेषण केले आहे. उच्च निर्मितीमूल्य असलेल्या या गझलेवर भाष्य करतानाच
समीक्षकांनी तिचे श्रेष्ठत्व वेळोवेळी प्रमाणित केले आहे.
कहाँ तो तय था चिरागाँ हरेक घर के लिए
कहाँ चिराग मयस्सर नहीं शहर के लिए
यहाँ दरख्तों के साए में धूप लगती है
चलो यहाँ से चले उम्रभर के लिए
न हो कमीज तो पाँवोसे पेट ढक लेंगे
ये लोग कितने मुनासिब है, इस सफ़र के लिए
वे मुतमइन है कि पत्थर पिघल नहीं सकता
मै बेकरार हूँ आवाज़ में असर के लिए
('साये मी धूप', पृ. १३ )
गझल लिहिताना गझलकाराला विचारांचा समुद्र कमंडलू मध्ये धारण करणारा अगस्ती
व्हावे लागते, तेव्हा कुठे गझल सशक्त बनते. म्हणजेच शेर लिहित असताना एखादा
विषय अथवा विचार त्याच्या संपूर्ण व्याप्तीसह मोजक्या शब्दात मांडावा लागतो
आणि हे करताना गझलेच्या तंत्राची चौकात सांभाळून अभिव्यक्तीतील प्रभावीपणा
कुठेही कमी होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागते. गझलेच्या पहिल्या
ओळीत एखाद्या विषयाची कौशल्यपूर्वक मांडणी केलेली असते आणि दुसऱ्या
ओळीत या विषयाचा कौशल्याने समारोप केलेला असतो. विषय वैविध्य ही सशक्त
गझल निर्मितीची अपरिहार्यता असते.
खँडहर बचे हुए है इमारत नहीं रही
अच्छा हुआ कि सर पर कोई छत नहीं रहीं
तमाम उम्र हमने अकेले सफ़र किया
हमपर किसी खुदा की इनायत नही रही
कुछ दोस्तोंसे वैसे मरासिम नहीं रहे
कुछ दुश्मनोंसे वैसी अदावत नहीं रही
साइन में जिंदगी के अलामत है अभी
गो जिंदगी की कोई जरुरत नहीं रही
('साये मी धूप', पृ. १८)
दुष्यंत कुमार यांची गझल वाचकांच्या मन:पटलांवर संवेदनांचे जे तरंग उमटवते,
ते वाचकांना विचार करायला भाग पाडतात. कवीच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या
संवेदना जेव्हा वाचकांच्या मनातील संवेदनांशी नाते सांगू लागतात आणि वाचकही
जेव्हा कवीच्या शब्दांमधील संवेदनांमध्ये स्वत:च्या संवेदना शोधू लागतात;
फक्त तेव्हाच कोणत्याही रचनेच्या निर्मितीस पूर्णत्व येते,असे म्हटले पाहिजे.
दुष्यंत कुमार यांची गझल बहुआयामी आहे. ती साचेबद्ध नाही. एक निरागसता
आणि प्रवाहीपणा या गझलेने जोपासला आहे.
इस रास्ते के नाम लिखो एक शाम और
या इसमे रोशनी का करो इंतजाम और
आँधी में सिर्फ हम ही उखड़कर नहीं गिरे
हमसे जुदा हुआ था कोई एक नाम और
मरघट पे भीड़ है या मजारों पे भीड़ है
अब गुल खिला रहा है तुम्हारा निजाम और
हैरां थे अपने अक्स पे घर के तमाम लोग
शीशा चटख गया तो हुआ एक काम और
सामाजिक विषयांवर देखील कवीने अनेक ठिकाणी मार्मिक भाष्य केले आहे. त्यामुळे सामाजिक वास्तवाबाबत अत्यंत जागरूक भान असलेली ही गझल असल्याचे वाचकाना
सहजपणे जाणवते. समाजातील विरोधाभासांवर कवीने काही अशआर ('शेर' चे अनेकवचन) मधून
प्रखरपणे प्रहार केल्याचे जाणवते. यासाठी उपरोधिक आणि उपहासगर्भ शैलीत भाष्य
करण्यात प्रभावी भाष्य करण्यात कवी यशस्वी ठरला आहे. दुष्यंत कुमार यांनी गैर-मुसलसील गझल जास्त प्रमाणात लिहिली आहे. गैर-मुसलसील गझले मध्ये वेगवेगळ्या विषयांवरील
शेर एकाच गझलेत समाविष्ट केलेले असतात. गैर-मुसलसीलीयत हे गझलेचे खास वैशिष्ट्य समजले जाते.
अब किसीको भी नजर नहीं आती कोई दरार
घर की हर दिवार पर चिपके है इतने इश्तेहार
हालते इन्सान पर बरहम न हो अहले वतन
वो कहींसे जिंदगी भी मांग लायेंगे उधार
रोज अखबारों में पढ़कर ये ख़याल आया हमें
इस तरफ आती तो हम भी देखते फ़स्ले बहार
जवळपास फक्त ५३ गझल रचना करूनही हिंदी गझलेचा शिखर्बिंदू असल्याची
सर्वमान्यता मिळाल्याने दुष्यंत कुमार यांच्या काव्यप्रतिभेचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.
-by Adv.Amol Waghmare
amolwaghmare001@gmail.com
mob-9404485850
8421561384
पुर्व प्रकाशन :"साक्षात" (एप्रिल-मे-जून ) - २०१२
Sunday, April 7, 2013
sangita joshi yanchi gazal (संगीता जोशी यांची गझल) : bhashya-adv. amol waghmare
संगीता जोशी यांची गझल: -adv. amol waghmare
मराठी भाषेमध्ये केवळ चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून खऱ्या अर्थाने तंत्रशुद्ध गझल लेखनाला सुरवात झाली.मूलतः अरबी भाषेतील हा प्रकार नंतर फार्सीत, त्यानंतर उर्दू व हिंदीत आणि त्यानंतर मराठीत आला.अरबी, फार्सी,उर्दू,हिंदी,मराठी असा या काव्यप्रकाराचा प्रवास होत असतानाच प्रत्येक भाषेने त्यावर स्वतःचे संस्कार केले.प्रत्येक भाषेचा सुगंध या काव्यप्रकारामध्ये तितक्याच सहजतेने आणि समर्थपणे दरवळला.मराठी भाषेमध्ये वर नमूद केलेल्या इतर भाषांच्या तुलनेत फारच कमी काळापासून गझललेखन होत आहे.त्यामुळे सशक्त गझल लिहू शकणाऱ्या गझलकारांची संख्याही कमी आहे.अशांमध्येही गझल लेखनामध्ये स्वतःचा ठसा उमटवू शकणाऱ्या गझलकारांची संख्या फारच कमी आहे. मराठी मध्ये जे मोजके गझलकार गझल लेखनामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत,त्यापैकी एक म्हणजे संगीता जोशी!
स्व.सुरेश भटांनंतरच्या पिढीतील गझलकार असूनही त्यांच्या गझलेची अथवा शैलीची छाप संगीता जोशी यांच्या शैलीवर दिसत नाही.उर्दू गझलेच्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह त्यांची गझल रसिक-वाचकांच्या भेटीस येते.संगीता जोशींच्या शब्दांना एक अंगीभूत लय आहे.याशिवाय गझलेचे तंत्र देखील त्यांनी काटेकोरपणे पाळलेले आहेत आणि सर्व तांत्रिक निकष सांभाळून देखील अभिव्यक्ती मधील सहजता लक्षात घेण्यासारखी आहे.
फुले म्लान झाली कुणा काय त्याचे
धुळीला मिळाली,कुणा काय त्याचे
घरांचा जीवांचा तिने घास केला
अशी लाट आली कुणा काय त्याचे
गळी शैशावाच्या भुकेचेच ओझे
झुके ते अकाली कुणा काय त्याचे
इथे भ्रष्ट आचार त्याला प्रतिष्ठा
गुणांना न वाली कुणा काय त्याचे
रदीफ आणि काफिया ही गझलेची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत; पण काफिया ही जशी गझलेची अनिवार्यता आहे तसे रदीफच्या बाबतीत नाही. गझलेमध्ये रादिफचा वापर करणे हे गझलकाराच्या इच्छेवर अवलंबून असते. त्यामुळे अनेक गझलकार काफियाने शेवट होणारी गझल लिहिताना दिसतात.या प्रकारच्या गझलेला 'गैर - मुरद्दफ़ गझल ' असे म्हणतात.अशा प्रकारची गझल मराठीत देखील मोठ्या प्रमाणावर लिहिली जात आहे.
ह्रस्वांत काफियाचे शेवटचे अक्षर ह्रस्व असते. त्यामुळे अशा प्रकारचा काफिया निभावणे फार अवघड असते.याचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या
गझलेमध्ये प्रत्येक शेरचे शेवटचे अक्षर हे ह्रस्व असते. त्यामुळे या काफियाने पूर्ण होणारी गझल लिहिणे हे
एक आव्हानच असते.म्हणून तांत्रिक निकषांची परिपूर्ती करत प्रभावी शेर लिहिणे अवघड बनते. अशा वेळी गझलकाराने आशयाभिव्याक्तीच्या बाबतीत तडजोड केली, तर गझल प्रभावहीन बनते. थोडक्यात काय तर ह्रस्वांत काफियाने पूर्ण होणारी गझल लिहिणे हे एक आव्हान असते.मराठीत ह्रस्वांत काफियाची
गझल ज्या काही मोजक्या गझलकारांनी सशक्तपणे लिहिली आहे,त्यापैकी संगीता जोशी या एक होत.
अजुनी ती जखम जुनी वाहतेच....
हृदयाला सुख सुद्धा जाळतेच....
जग सारे दाबके आहे गढूळ
चिखलाचे शिंतोडे उडवतेच...
उपयोगी नसते क्षमताच फक्त
पहिला क्रम मिळविती कासवेच...
छोटी बहर अर्थात लहान वृत्तात कवयित्रीने अतिशय ताकदीने गझल लिहिल्या आहेत. या प्रकारामध्ये शब्दमर्यादा कमी असते. त्यामुळे कमीतकमी शब्दात जास्तीत-जास्त आशय व्यक्त करावा लागतो. तसेच वृत्त देखील योग्य प्रकारे सांभाळावे लागते. त्यामुळे शब्दातील अचूकता ही गझलेची परिणामकारकता वाढवते.
आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे
हे दु:ख नेहमीचे
होते तसेच आहे
बोलू घरी कुणाशी
ते ही सुनेच आहे
तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे
संगीता जोशी यांच्या गझलेमधून स्त्री जाणिवेचे यथार्थ चित्रण आले आहे.त्यांच्या गझलेतील विषयवैविध्य लक्षणीय असून विषयमांडणी अतिशय कौशल्यपूर्वक केली असल्याचे दिसून येते. स्त्रीमनाच्या भावना आणि वेदनाही त्यांच्या गझलेतून आक्रामकतेने नाही, तर स्वाभाविकतेने व्यक्त होतात.याशिवाय अभिव्यक्तीतील सहजता ही आशयाच्या सौंदर्याला वृद्धिंगत करणारी ठरते.
ओठ शिवण्याचे कुठे शिकलीस पोरी
तू न फुलता का अशी मिटलीस पोरी
नवऋतू येता कळीचे फूल झाले
पाहुनी ते खिन्न का हसलीस पोरी
तान्हुल्या ओठी दुधाचे थेंब देण्या
आटवूनी रक्त तू झीजालीस पोरी
भाकरीची भूक जेव्हा आग झाली
मूक तू खिडकीतही बसलीस पोरी
संगीता जोशी यांचे आतापर्यंत 'म्युझिका', 'वेदना-संवेदना','चांदणे उन्हातले' हे गझल संग्रह आणि 'मानस' व 'स्किझॉस' हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या गझलेला पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज,सुरेश भट यासारख्या दिग्गजांची प्रशंसा लाभली आहे. अमरावती येथे झालेल्या तिस-या अ.भा. मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले आहे. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. मराठी आणि उर्दुचा त्यांचा चांगला अभ्यास असून गझल लेखन वाढीस लागावे यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर स्वतंत्र मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतल्या आहेत. जबलपूर येथून प्रकाशित झालेल्या भारत आणि पाकिस्तानातील कवयित्रींच्या उर्दू गझलांचा समावेश असलेल्या 'गुलमोहर' या प्रातिनिधिक गझलसंग्रहामध्ये संगीता जोशींच्या दोन गझलांचा समावेश करून त्यांच्या गझल लेखनातील योगदानाची योग्य ती दाखल घेण्यात आली आहे. जीवनाप्रती अपार प्रेम,आशावाद त्यांच्या गझलेतून व्यक्त होतो.
हारण्यास एक नवा डाव पाहिजे
साकळे जुना नवीन घाव पाहिजे
फत्तरासही फुटू शकेल पालवी
आसवात एवढा प्रभाव पाहिजे
अंधकार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतिचा उठाव पाहिजे
दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे
समकालीन सामाजिक वास्तवावर त्यांनी आपल्या गझलेच्या माध्यमातून प्रभावी भाष्य केले आहे. जीवनातील सुखाइतकेच दु:खावरही प्रेम करण्याची उदात्त भावना ही गझलेच्या स्वाभाविकतांपैकी एक आहे. म्हणून हा नकारात्मकतेकडे नेणारा काव्यप्रकार नसून एक सकारात्मक दृष्टी देण्याची ताकद असलेला काव्यप्रकार आहे. संगीता जोशी यांच्या गझलेमधील शब्दसौंदर्य,अभिव्यक्तीमधील स्पष्टता, शब्दांमधील सहजता, अचूक व प्रभावी शब्दयोजन,तांत्रिक निकषांचे अचूक पालन यामुळे त्यांची गझल रसिक वाचकांच्या मनात घर करून राहिली आहे.
पूर्व प्रकाशन 'साक्षात'(एप्रिल,मे,जून २०१२)
------by Adv.Amol A. Waghmare,
Aurangabad (Maharashtra, India)
amolwaghmare001@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)